आपल्या ध्येयात दृष्टिलक्ष्यचे इंजिन लावा – ऊर्जा आणि दुप्पट उत्साहाचा संयोग

एका मोठ्या नदीच्या पलिकडे एक गाव होतं. गावाबाहेर कुठेही जायचं असेल तर गावकरी स्वतःची नाव वापरत. शिवाय ती गावातल्याच बांबुंपासून तयार करत असत. सर्व गावकरी मंडळी सकाळी उठून आपापली नाव घेऊन लगबगीनं कामाला जात आणि संध्याकाळी घरी परतत. एकदा गावात एक पाहुणा आला, तो इंजिनियर होता. गावकर्‍यांना नदी ओलांडण्यासाठी कोणत्या

Read More »

ध्येयपूर्ती – सार्थक जीवनाचा राजमार्ग

पोलंडमधील सुप्रसिद्ध धर्मगुरू हाफिज हईम यांची ही गोष्ट. एके दिवशी त्यांना भेटण्यासाठी एक अमेरिकन प्रवासी त्यांच्या घरी आला आणि हाफिज हईम यांची साधी राहणी पाहून अचंबित झाला; कारण महान धर्मगुरू असूनही हाफिज हईम एका छोट्याशा खोलीत राहत होते. शिवाय त्या खोलीत ग्रंथांशिवाय इतर कोणतीच वस्तू नव्हती. एक छोटा टेबल आणि

Read More »
एक साथ मीठे और उदासीन कैसे बनें तोलमोल के मुँह खोल

शब्दशक्तीची किमया

शब्दांची ताकद सर्वांनाच माहीत आहे. शब्दांचं माहात्म्य सांगणारी अनेक उदाहरणं इतिहासात वाचायला मिळतात. वरदान, शाप आणि प्रतिज्ञेचं फळ अशा स्वरूपाच्या कहाण्या आपण नेहमीच वाचत, ऐकत तसेच पाहत आलो आहोत. या सर्वांमागे दडलेल्या शक्तीचं नाव, ‘शब्दशक्ती.’ आश्चर्याची बाब म्हणजे, प्रत्येक माणसाकडे ही शब्दशक्ती असूनही तिच्या उपयोगासंबंधी मात्र तो अनभिज्ञ आहे. तसं

Read More »

आत्मनिर्भरता – गौरवशाली जीवनाचा प्राण

या जगात असं कोण असेल, जो सुखी, संतुष्ट आणि गौरवशाली जीवन जगण्याची इच्छा बाळगत नसेल? याचं उत्तर आहे, आपण आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने सुखी, संतुष्ट, गौरवशाली जीवन जगावं, असं तर प्रत्येकालाच वाटत असतं. मग आता प्रश्न असा निर्माण होतो, की असा जादू करणारा कोणता मंत्र आहे, जो तुमची ही

Read More »

ग्लोरी ऑफ अ‍ॅक्शन (२०२०)

सरश्रींद्वारे दिलेल्या नववर्षाच्या संदेशाचा काही अंश आपणा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा, गोआत आपलं मनःपूर्वक स्वागत… 2020 या नूतन वर्षाचा हा संदेश अतिशय सरळ आहे… आपल्याला गोआ येथे जायचं आहे. मात्र, आपल्याला गोआ येथेच जायला का सांगितलं जातंय, याचं आश्चर्यही तुम्हाला वाटू शकतं. पण, आपण जेथे कुठे आहात – आपलं घर, ऑफिस,

Read More »

‘सातत्य’ हा गुण कसा विकसित कराल?

आरंभशूर लोक कार्याची सुरुवात तर अगदी उत्साहात करतात. परंतु काही दिवसांतच त्यांचा उत्साह कमी होत जातो. परिणामी कार्यात सातत्य राहत नाही. अशावेळी निरंतरता हा गुण कसा अंगीकारावा, हा प्रश्न निर्माण होतो. उत्तरादाखल सर्वप्रथम हे सांगितलं जाईल, ‘निरंतरता ही यशाची गुरुकिल्ली आहे.’ कोणीही एखाद्या कार्याची सुरुवात करतो, तेव्हा त्याला लगेचच यश

Read More »

चिंतामुक्तीचं सरळ-सोपं सूत्र

चिंतामुक्तीचं सरळ-सोपं सूत्र ‘जेव्हाचं तेव्हा पाहू.’ करण्यायोग्य कर्तव्यकर्म आता करा मनुष्याच्या जीवनात कधी सुख तर कधी दुःख असा ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असतो. अशा स्थितीत त्याच्या मनात चिंतेचं सावट येतं. प्रत्येकाची चिंता वेगवेगळी असू शकते. अविवाहिताला लग्नाची… मुलांना अभ्यासाची… गृहिणीला कुटुंबाची… पतीला व्यवसाय किंवा नोकरी यांची… वयस्कर लोकांना आरोग्याची… युवकांना नोकरीची

Read More »

आत्महत्येचे विचार आले तर काय कराल?

प्रश्न : सरश्री, कित्येक वेळा मन उदास होतं आणि मग त्यावेळी ‘या जगाला माझी काही आवश्यकताच नाही, मग जगून काय फायदा?’ असे निराशाजनक विचार मनात येतात. त्यामुळे कधी-कधी आत्महत्या करण्याचे विचारही मनात डोकावून जातात. तेव्हा, या समस्येतून मी मुक्त कसं व्हावं? सरश्री : मनुष्याच्या मनात नेहमी अगणित विचार सुरूच असतात.

Read More »

इच्छांच्या भोवर्‍यापासून कसं वाचाल

इच्छा… कामना… आकांक्षा… यांना कोणतंही नाव द्या; सर्वांचा अर्थ एकच आहे. मनुष्याचं मन क्षणोक्षणी इच्छांनी भरलेलं असतं. एक इच्छा पूर्ण होते न होते, तोवर दुसरी इच्छा जागृत होते. मग तिसरी… चौथी… आणि हे चक्र अव्याहतपणे अगदी जीवनाच्या अंतापर्यंत सुरूच राहतं. इतकंच नव्हे, तर मृत्यू दारात उभा असतानाही मनुष्याच्या मनात एखादी

Read More »

कर्म आणि भाग्य यांपासून मुक्ती – योग्य उद्देशाने व्हावी फलप्राप्ती

कर्म म्हणजे काय? मनुष्याच्या कर्मांनुसार त्याला त्याचं फळ मिळतं का? ‘करावं तसं भरावं’ ही म्हण तुम्हाला माहीत असेलच. पण खरंच असं घडतं का? यामागे कोणतं रहस्य दडलंय? अशा प्रकारे मनुष्याच्या मनात कर्मासंबंधी अगणित प्रश्न निर्माण होतात. कधी त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, तर कधी मिळतच नाहीत किंवा ती समाधानकारक तरी नसतात.

Read More »

भीती! साहसाची ओळख – तू तुझं काम कर… आणि मी माझं…

‘भीती’ केवळ हा शब्द ऐेकताच आपली छाती धडधडू लागते, हृदयाची स्पंदनं वाढतात, हात-पाय थरथरू लागतात, शरीराला दरदरून घाम फुटतो आणि निर्णय घेण्याची क्षमतादेखील संपुष्टात येते. ‘भीतीची भीती’ ही साधारणतः सर्वांनाच असते. कारण आजपर्यंत आपण भीतीला भीतच आलो आहोत. परंतु आता आपण भीतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. ज्यायोगे आजपासून तुम्ही म्हणू

Read More »

2018 मध्ये समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे भगवद्गीतेद्वारे शिका

आपण नवीन शतकाच्या 18व्या वर्षात प्रवेश केला आहे. म्हणून 18 या अंकाचं वर्तमानात, सद्यःस्थितीत विशेष महत्त्व आहे. कारण निरनिराळ्या धर्मांमध्ये आणि परंपरांमध्येदेखील 18 या अंकाला विशेष स्थान दिलं गेलं आहे. ज्यू लोक कोणतंही दान देताना ते 18च्या पटीत देतात. चीनमध्येदेखील 18 हा अंक शुभ मानला जातो आणि त्याची यश आणि

Read More »