मृत्यू उपरांत जीवन
महाजीवनाचा आरंभ
मृत्यूला जर जाणायचे असेल, तर मृत्यूइतका उत्तम शिक्षक नाही… जगात खूप कमी लोक मृत्यूविषयी जाणू इच्छितात… व्यक्तीतील अहंकार आणि मृत्यूविषयीचे अज्ञानच मृत्यूचे भय निर्माण करते…
पृथ्वीवर मानवीशरीरात एक अपूर्व तयारी चालू आहे… मृत्यूनंतरही जीवन असते, हे सत्य जाणून घेणारा आयुष्याचा एकही क्षण वाया जाऊ देत नाही… प्रत्येक घटनेतून योग्य बोध घेऊन तो आपले धैर्य वाढवण्याचा निर्धार करेल… संपूर्ण विश्वासाठी निमित्त ठरेल…खरंतर मृत्यूविषयी लोकांच्या मनात अनेक समज, गैरसमज निर्माण झालेले असतात. सर्वांनी मृत्यूचे रहस्य जाणावे आणि निर्भय होऊन जीवन जगावे, हा संदेश या पुस्तकाद्वारे मिळतो. खरंतर मृत्यू म्हणजे अंत नसून तो तर महाजीवनाचा आरंभबिंदू आहे. पण याविषयी जाणून घेण्यासाठी गरज असते, सर्वसमावेशक दृष्टिकोनाची. प्रस्तुत पुस्तक तुम्हाला हाच दृष्टिकोन प्रदान करेल. कारण हे केवळ पुस्तक नसून हा आहे सरश्रींच्या प्रवचनांच्या मालिकातून आविष्कृत झालेला दीपस्तंभ.
—————————————————————
AMSY
द पॉवर बियॉण्ड युअर सबकॉन्शिअस माईंड
अदृश्य शक्तीचे चमत्कार व सात फायदे
आज माणूस सतत जो मोबाईल घेऊन फिरत आहे, त्या लहानशा मोबाईलमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले असते. फक्त अट एकच की मोबाईल इंटरनेटला जोडलेला असला पाहिजे. तुम्ही सर्वजण जाणता की इंटरनेट एका अदृश्य तरंगांनी एका टॉवरशी जोडलेले असते.
त्याचप्रमाणे प्रत्येकजण एका अदृश्य शक्तीशी जोडलेला असतो. फरक इतकाच की आपण त्याबाबतीत अनभिज्ञ असतो. ही शक्ती आपल्या अंतर्मनाच्या शक्तीच्याही पलीकडे आहे. ती आहे ए.एम.एस.वाय.ची शक्ती. अगदी बरोबर! हा शब्द कदाचित तुम्ही पाहिल्यांदाच ऐकला असेल. पण ए.एम.एस.वाय. हा आपल्या शरीराचाच एक अदृश्य भाग आहे. एकदा का तुम्ही या अदृश्य भागाशी जोडले गेलात तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल व तुम्ही तुमचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकाल.
उदाहरणार्थ,
तुम्ही विकासाच्या उच्चतम स्तरावर जीवन जगू शकता.
नात्यांमध्ये सखोल प्रेम अनुभवू शकता.
अदृश्य ए.एम.एस.वाय.च्या शक्तीच्या आधारे तुम्ही तुमच्या जीवनातील न उलगडलेल्या समस्यांचे निराकरण करू शकता.
सर्व निर्जीव वस्तूही उदाहरणार्थ, मोबाईल फोन, लॅपटॉप, गाडी, घर इ. तुमच्यासाठी चांगले काम करू शकतात.
लोकांशी व निसर्गातील सर्व प्राणिमात्रांशी तुमचे नाते चांगले होऊ शकते.
निरोगी आयुष्याबद्दल समज प्राप्त करून तुम्ही स्वतःला तसेच इतरांनाही निरोगी ठेवू शकता.
जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये संतुलन राखणे तुम्ही शिकू शकता.
प्रस्तुत पुस्तकामध्ये मानवी शरीरांच्या सर्व रहस्यांवरील पडदा एकेक करून दूर केला जात आहे. ते समजून घ्या व सरप्राइज गिफ्ट उघडून बघा. तुम्ही आर्श्यचकित व्हाल व जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल.
——————————————————
स्मृतींच्या उपचाराने जीवनाचा उपचार
मनुष्य खरंतर आपले बोध शिकण्यासाठी, निसर्गाचा विकास-तेजविकासाचा प्रवास पुढे नेण्यासाठी पृथ्वीवर आला आहे. पण चारही दिशांकडून येणार्या नकारात्मक तरंगांनी त्याला जडत्व येतं. त्याच्या स्मृतींमध्ये दबलेल्या जखमी आठवणी त्याला अस्वस्थ, बेचैन करतात. परिणामी तो त्याचं जीवन सार्थक बनवू शकत नाही.
या बाह्य कारणांमुळे निर्माण होणारी नकारात्मकता आपण थांबवू शकतो का? नाही ना! मग आपण असं काय करायला हवं, ज्यामुळे आपल्याला जीवन ओझं न वाटता, बाधा असल्या तरी हलकं-फुलकं राहून आनंदाने उड्डाण भरता येईल… इतरांमध्ये मंगल इच्छा जागृत करून, जीवनाचं सार्थक करता येईल! यावर उपाय आहे – कटू स्मृतींवर उपचार करून जीवनाचा उपचार… पण कसं? हे पुस्तक म्हणजे त्याचं उत्तर आहे!
यामध्ये तुम्हाला निसर्गाची प्रेममय कार्ययंत्रणा समजेल. शिवाय निसर्गाच्या कृतीयोजनेची सखोल रहस्यं तुमच्यासमोर उलगडतील. ती जाणून घेतल्यानंतर तुम्ही जीवनात जे काही करायला आला आहात, तेच कराल. पुस्तकातील मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत –
शरीरावर, मनावर ओझं लादण्याची चार मुख्य कारणं
कार्मिक बंधनं मिटवण्याच्या प्रभावशाली पद्धती
आयुष्यातील कटू अनुभवांचा आपल्यावर होणारा परिणाम आणि ते नष्ट करण्याचं महत्त्व
जखमी स्मृतींना बरे करण्याचे उपाय- सार्थक सबक
सार्थक सबक शिकण्यासाठी निसर्गाद्वारे केलेली विशेष व्यवस्था- लोक, घटना, परिस्थिती…
चला तर, पुस्तक उघडून जखमी स्मृतींच्या उपचाराने जीवनाचा उपचार नियम जाणू या, आपले सार्थक बोध शिकू या!
Reviews
There are no reviews yet.